Sunday 25 December 2022

तुमको देखा तो ख़याल आया

*कधी कधी पहाटते उरी आगळी प्रतीती,* *जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपते चित्ती!!* सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकरांच्या *जिप्सी* कवितेतील या ओळी आहेत. मंगेश पाडगावकर जसे निसर्ग कवी म्हणून मान्यताप्राप्त आहेत तसेच प्रणयी थाटाच्या रंगतदार कविताकार म्हणून तितकेच प्रसिद्ध आहेत. *जिप्सी* या कवितेने पाडगावकरांना धुक्यातून प्रकाशात आणले आणि पुढे किमान ४,५ दशके तरी, पाडगावकर प्रकाशात राहिले. आजच्या आपल्या गाण्याच्या संदर्भात - *तुमको देखा तो ख़याल आया*, तसे बघितले फारसा जवळून येणार संबंध दिसत नाही पण तरीही *पहाटते उरी आगळी प्रतीती* या शब्दांशी नाते जुळते. आजची कविता प्रख्यात शायर जावेद अख्तर यांची आहे. सुप्रसिद्ध शायर *जान निसार अख्तर* यांचे सुपुत्र. वडिलांच्या रक्तातील काही जीन्स मुलात उतरले आणि त्यामानाने खूप उशिराने जावेद अख्तर यांनी शायरी क्षेत्रात प्रवेश केला. परंतु लगोलग त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. आजची शब्दरचना *गज़ल* म्हणावी का? चित्रपट माध्यमात निखळ गज़ल अपवादस्वरूप बघायला मिळते आणि त्याचे मुख्य कारण चित्रपटात नेहमी पडद्यावरील पात्राची भावना शब्दात व्यक्त करायची असल्याने, त्या *एकाच* भावनेला मध्यवर्ती ठेऊन, काव्य लिहायचे असते. परिणामी *गज़लेतील प्रत्येक अंतरा ही सार्वभौम कविता असते* ही अट पाळणे अवघड होऊन बसते. ध्रुवपदातील आशय, पुढील कडव्यांतून विस्तारित करणे,ही चित्रपट गीताची मागणी असल्याने, मी वर तसे लिहिले. त्यामुळे गझलच्या आकृतिबंधातील रचना, जिला *नज्म* म्हणतात, तशी आजची कविता आहे. पहिल्याच ओळीत प्रेयसीबद्दलची आतुर भावना व्यक्त झाल्यावर, पुढे याचा भावनेचे स्फटिकीकरण केलेले आहे. *आज फिर दिल ने एक तमन्ना की* *आज फिर दिल को हमने समझाया* या ओळी हीच भावना दर्शवतात. एकूणच सगळी कविता वाचल्यास, गज़ल रचनेचे आणखी एक वैशिष्ट्य असते, कडव्याच्या दुसऱ्या ओळीत कुठेतरी तिरकस अभिव्यक्ती किंवा काहीसा धक्का देणारी कल्पना असते, जेणेकरून ऐकणारा चकित होतो. तसे इथे काही फारसे वाचायला मिळत नाही परंतु म्हणून ही कविता *सपक* किंवा *सरधोपट* नक्कीच म्हणता येणार नाही. *हम जिसे गुनगुना नहीं सकते* *वक़्त ने ऐसा गीत क्यूँ गाया* या ओळींतून संपूर्ण वेगळा आशय मांडला आहे. दुसरे असे, एकूणच रचना बारकाईने वाचल्यावर सगळ्या ओळीत समान शब्दसंख्या नाही, पर्यायाने अक्षरे देखील नाहीत. छंदोबद्ध कविता रचनेत शब्दसंख्येचे तत्व नेहमीच पाळले जाते. असे असून देखील एक कविता म्हणून कविता वेगवेगळ्या भाववृत्ती स्पष्ट करते. जावेद अख्तर प्रामुख्याने उर्दू रचनाकार म्हणून ख्यातकीर्त असले तरी इथली कविता, अतिशय सोप्या शब्दात लिहिली आहे. उर्दू आणि हिंदी भाषिक शब्दांची सरमिसळ सुंदर रीतीने विणलेली आहे. मुळात *ज़िंदगी धुप, तुम घना साया* या सुरवातीच्या ओळीमधून मध्यवर्ती कल्पना सुस्पष्ट केली आहे. या गाण्याची स्वररचना ही कुलदीप सिंग या अप्रकाशित संगीतकाराने केली आहे. कुलदीप सिंग काय किंवा कनू रॉय काय, स्वतंत्र प्रज्ञेचे कलावंत असून देखील एकूणच उपेक्षेच्या खाईत वावरले गेले आणि त्यामुळे फार लवकर विस्मृतीत गेले. हे दोन्ही संगीतकार, जेंव्हा चित्रपट मिळाले, ते थोडे *आडवळणी* असल्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश वगैरे मिळवू शकले नाही आणि जिथे यश या शब्दाभोवती कारकीर्द उभी असते, तिथे हे कलावंत मागे पडले. *कामोद* या काहीशा अप्रचलित रागाधारित स्वररचना बांधलेली आहे. *दोन्ही मध्यम आणि बाकीचे सगळे शुद्ध स्वर* अशी या रागाची स्वरसंहती आहे. *कल्याण* थाटातील राग आहे. *ग म(तीव्र) प ग म(तीव्र) रे सा* किंवा *सा रे सा ध ध प* अशा स्वरांचे चलन ऐकायला मिळते.आता या पार्श्वभूमीवर या गाण्याची स्वररचना बघायचे झाल्यास, *तुमको देखा तो ख़याल आया* ही ओळ *रे नि धप प रे रेनि धनि* या सुरांत गुंफले आहे तर पुढील ओळ * ज़िंदगी धुप, तुम घना साया* ही *निसाग रेसा सा साग रेसानि* अशा सुरांत ऐकायला मिळते. *तीव्र मध्यम* स्वर आपल्याला पहिल्या अंतऱ्याच्या पहिल्या ओळीत ऐकायला मिळतो. आता संगीतकार स्वररचना करताना रागाचे सूर कशा पद्धतीने घेतो, हे सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून असते. गाण्याची चाल अगदी सोपी आणि सरळ आहे. बहुदा गायक जगजीत सिंग नजरेसमोर ठेऊन स्वररचना केली असावी, इतके साम्य दिसते. एकूणच वाद्यमेळ अतिशय थोडा आणि गझलच्या पठडीत बसणारा आहे. परिणामी श्रवणीयता वाढली आहे. वर लिहिल्याप्रमाणे गायन जगजीत सिंग यांनी केले आहे. हे गाणे जेंव्हा रेकॉर्ड केले त्यावेळेपर्यंत या गायकाची गायनशैली प्रस्थापित झाली होती, बरीचशी *स्टायलाईज्ड* झाली होती. खरंतर ही शैली त्यांनी शेवटपर्यत आपल्याबरोबर वागवली होती. एकूणच संथ, शांत आवाजात गायन करायचे, मध्य सप्तक आणि खर्जात गायनाची पट्टी ठेवायची. फार क्वचित तार सप्तकातील सूर गाठायचे. गाताना, शायरच्या शब्दांना शक्यतो गोंजारून घ्यायची वृत्ती होती आणि ती वृत्ती या गायनातून स्पष्टपणे ऐकायला मिळते. त्या दृष्टीने *शब्दप्रधान* गायकी असे म्हणता येईल. गाताना शक्यतो दीर्घ ताना किंवा हरकती टाळण्याकडे कल अधिक होता. अर्थात उर्दू शब्दांवरील प्रभुत्व दिसून येते. अत्यंत मुलायम आवाज आणि तरीही सुरांशी कुठेही फारकत नाही, ताना अगदी हलक्या जातीच्या पण तरीही गळ्याचे नेमके "वजन" दर्शवून देणाऱ्या, अशा प्रकारे या गायकाच्या गायकीचे वर्णन करता येईल. बहुतेक गायकांना, गझल गायन म्हणजे स्वत:च्या गळ्याची "फिरत" आणि "ताकद" दाखवण्याचे साधन वाटते आणि या मोहाला बरेचसे प्रसिध्द गायक बळी पडलेले दिसतात. कधीतरी सरगम, मूर्च्छना आणि हरकती हे अलंकार मिरवायला ठीक आहे पण ते अलंकार आहेत, याचेच भान खूपवेळा विसरले जाते. वास्तविक, सरगम ही, पुढील तान कशी असेल, याची पूर्वकल्पना असते, निदान असावी आणि पुढील तान ही, त्या कवितेतील आशयाला अधिक विस्तारित करणारी हवी, याचेच भान विसरले जाते. कितीही झाले तरी आपण जी गायकी सादर करीत आहोत, ते उपशास्त्रीय संगीत आहे आणि रागदारी संगीत नव्हे, हाच विचार जगजीत सिंग यांच्या गायकीत नेहमी दिसून येतो. *आज फिर दिल को हमने समझाया* या ओळीतील *झा* हे अक्षर कसे गायले आहे,त्यावरून गायकाचा भाषेबद्दलचा *अंदाज* जाणून घेता येतो. गाण्यात जोडाक्षरे फारच कमी आहेत परंतु जी आहेत, त्यांचा उच्चार देखील अतिशय मुलायम करण्याकडे कल अधिक. चाल सोपी आणि श्रवणीय, गायन तर त्यापेक्षा अधिक परिणामकारक, त्यामुळे हे गाणे आजही लोकांच्यात प्रसिद्ध आहे, यात नवल ते कुठले!! तुमको देखा तो ख़याल आया ज़िंदगी धुप, तुम घना साया आज फिर दिल ने एक तमन्ना की आज फिर दिल को हमने समझाया तुम चले जाओगे तो सोचेंगे हमने क्या खोया, हमने क्या पाया हम जिसे गुनगुना नहीं सकते वक़्त ने ऐसा गीत क्यूँ गाया *कधी कधी पहाटते उरी आगळी प्रतीती,* *जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपते चित्ती!!* सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकरांच्या *जिप्सी* कवितेतील या ओळी आहेत. मंगेश पाडगावकर जसे निसर्ग कवी म्हणून मान्यताप्राप्त आहेत तसेच प्रणयी थाटाच्या रंगतदार कविताकार म्हणून तितकेच प्रसिद्ध आहेत. *जिप्सी* या कवितेने पाडगावकरांना धुक्यातून प्रकाशात आणले आणि पुढे किमान ४,५ दशके तरी, पाडगावकर प्रकाशात राहिले. आजच्या आपल्या गाण्याच्या संदर्भात - *तुमको देखा तो ख़याल आया*, तसे बघितले फारसा जवळून येणार संबंध दिसत नाही पण तरीही *पहाटते उरी आगळी प्रतीती* या शब्दांशी नाते जुळते. आजची कविता प्रख्यात शायर जावेद अख्तर यांची आहे. सुप्रसिद्ध शायर *जान निसार अख्तर* यांचे सुपुत्र. वडिलांच्या रक्तातील काही जीन्स मुलात उतरले आणि त्यामानाने खूप उशिराने जावेद अख्तर यांनी शायरी क्षेत्रात प्रवेश केला. परंतु लगोलग त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. आजची शब्दरचना *गज़ल* म्हणावी का? चित्रपट माध्यमात निखळ गज़ल अपवादस्वरूप बघायला मिळते आणि त्याचे मुख्य कारण चित्रपटात नेहमी पडद्यावरील पात्राची भावना शब्दात व्यक्त करायची असल्याने, त्या *एकाच* भावनेला मध्यवर्ती ठेऊन, काव्य लिहायचे असते. परिणामी *गज़लेतील प्रत्येक अंतरा ही सार्वभौम कविता असते* ही अट पाळणे अवघड होऊन बसते. ध्रुवपदातील आशय, पुढील कडव्यांतून विस्तारित करणे,ही चित्रपट गीताची मागणी असल्याने, मी वर तसे लिहिले. त्यामुळे गझलच्या आकृतिबंधातील रचना, जिला *नज्म* म्हणतात, तशी आजची कविता आहे. पहिल्याच ओळीत प्रेयसीबद्दलची आतुर भावना व्यक्त झाल्यावर, पुढे याचा भावनेचे स्फटिकीकरण केलेले आहे. *आज फिर दिल ने एक तमन्ना की* *आज फिर दिल को हमने समझाया* या ओळी हीच भावना दर्शवतात. एकूणच सगळी कविता वाचल्यास, गज़ल रचनेचे आणखी एक वैशिष्ट्य असते, कडव्याच्या दुसऱ्या ओळीत कुठेतरी तिरकस अभिव्यक्ती किंवा काहीसा धक्का देणारी कल्पना असते, जेणेकरून ऐकणारा चकित होतो. तसे इथे काही फारसे वाचायला मिळत नाही परंतु म्हणून ही कविता *सपक* किंवा *सरधोपट* नक्कीच म्हणता येणार नाही. *हम जिसे गुनगुना नहीं सकते* *वक़्त ने ऐसा गीत क्यूँ गाया* या ओळींतून संपूर्ण वेगळा आशय मांडला आहे. दुसरे असे, एकूणच रचना बारकाईने वाचल्यावर सगळ्या ओळीत समान शब्दसंख्या नाही, पर्यायाने अक्षरे देखील नाहीत. छंदोबद्ध कविता रचनेत शब्दसंख्येचे तत्व नेहमीच पाळले जाते. असे असून देखील एक कविता म्हणून कविता वेगवेगळ्या भाववृत्ती स्पष्ट करते. जावेद अख्तर प्रामुख्याने उर्दू रचनाकार म्हणून ख्यातकीर्त असले तरी इथली कविता, अतिशय सोप्या शब्दात लिहिली आहे. उर्दू आणि हिंदी भाषिक शब्दांची सरमिसळ सुंदर रीतीने विणलेली आहे. मुळात *ज़िंदगी धुप, तुम घना साया* या सुरवातीच्या ओळीमधून मध्यवर्ती कल्पना सुस्पष्ट केली आहे. या गाण्याची स्वररचना ही कुलदीप सिंग या अप्रकाशित संगीतकाराने केली आहे. कुलदीप सिंग काय किंवा कनू रॉय काय, स्वतंत्र प्रज्ञेचे कलावंत असून देखील एकूणच उपेक्षेच्या खाईत वावरले गेले आणि त्यामुळे फार लवकर विस्मृतीत गेले. हे दोन्ही संगीतकार, जेंव्हा चित्रपट मिळाले, ते थोडे *आडवळणी* असल्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश वगैरे मिळवू शकले नाही आणि जिथे यश या शब्दाभोवती कारकीर्द उभी असते, तिथे हे कलावंत मागे पडले. *कामोद* या काहीशा अप्रचलित रागाधारित स्वररचना बांधलेली आहे. *दोन्ही मध्यम आणि बाकीचे सगळे शुद्ध स्वर* अशी या रागाची स्वरसंहती आहे. *कल्याण* थाटातील राग आहे. *ग म(तीव्र) प ग म(तीव्र) रे सा* किंवा *सा रे सा ध ध प* अशा स्वरांचे चलन ऐकायला मिळते.आता या पार्श्वभूमीवर या गाण्याची स्वररचना बघायचे झाल्यास, *तुमको देखा तो ख़याल आया* ही ओळ *रे नि धप प रे रेनि धनि* या सुरांत गुंफले आहे तर पुढील ओळ * ज़िंदगी धुप, तुम घना साया* ही *निसाग रेसा सा साग रेसानि* अशा सुरांत ऐकायला मिळते. *तीव्र मध्यम* स्वर आपल्याला पहिल्या अंतऱ्याच्या पहिल्या ओळीत ऐकायला मिळतो. आता संगीतकार स्वररचना करताना रागाचे सूर कशा पद्धतीने घेतो, हे सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून असते. गाण्याची चाल अगदी सोपी आणि सरळ आहे. बहुदा गायक जगजीत सिंग नजरेसमोर ठेऊन स्वररचना केली असावी, इतके साम्य दिसते. एकूणच वाद्यमेळ अतिशय थोडा आणि गझलच्या पठडीत बसणारा आहे. परिणामी श्रवणीयता वाढली आहे. वर लिहिल्याप्रमाणे गायन जगजीत सिंग यांनी केले आहे. हे गाणे जेंव्हा रेकॉर्ड केले त्यावेळेपर्यंत या गायकाची गायनशैली प्रस्थापित झाली होती, बरीचशी *स्टायलाईज्ड* झाली होती. खरंतर ही शैली त्यांनी शेवटपर्यत आपल्याबरोबर वागवली होती. एकूणच संथ, शांत आवाजात गायन करायचे, मध्य सप्तक आणि खर्जात गायनाची पट्टी ठेवायची. फार क्वचित तार सप्तकातील सूर गाठायचे. गाताना, शायरच्या शब्दांना शक्यतो गोंजारून घ्यायची वृत्ती होती आणि ती वृत्ती या गायनातून स्पष्टपणे ऐकायला मिळते. त्या दृष्टीने *शब्दप्रधान* गायकी असे म्हणता येईल. गाताना शक्यतो दीर्घ ताना किंवा हरकती टाळण्याकडे कल अधिक होता. अर्थात उर्दू शब्दांवरील प्रभुत्व दिसून येते. अत्यंत मुलायम आवाज आणि तरीही सुरांशी कुठेही फारकत नाही, ताना अगदी हलक्या जातीच्या पण तरीही गळ्याचे नेमके "वजन" दर्शवून देणाऱ्या, अशा प्रकारे या गायकाच्या गायकीचे वर्णन करता येईल. बहुतेक गायकांना, गझल गायन म्हणजे स्वत:च्या गळ्याची "फिरत" आणि "ताकद" दाखवण्याचे साधन वाटते आणि या मोहाला बरेचसे प्रसिध्द गायक बळी पडलेले दिसतात. कधीतरी सरगम, मूर्च्छना आणि हरकती हे अलंकार मिरवायला ठीक आहे पण ते अलंकार आहेत, याचेच भान खूपवेळा विसरले जाते. वास्तविक, सरगम ही, पुढील तान कशी असेल, याची पूर्वकल्पना असते, निदान असावी आणि पुढील तान ही, त्या कवितेतील आशयाला अधिक विस्तारित करणारी हवी, याचेच भान विसरले जाते. कितीही झाले तरी आपण जी गायकी सादर करीत आहोत, ते उपशास्त्रीय संगीत आहे आणि रागदारी संगीत नव्हे, हाच विचार जगजीत सिंग यांच्या गायकीत नेहमी दिसून येतो. *आज फिर दिल को हमने समझाया* या ओळीतील *झा* हे अक्षर कसे गायले आहे,त्यावरून गायकाचा भाषेबद्दलचा *अंदाज* जाणून घेता येतो. गाण्यात जोडाक्षरे फारच कमी आहेत परंतु जी आहेत, त्यांचा उच्चार देखील अतिशय मुलायम करण्याकडे कल अधिक. चाल सोपी आणि श्रवणीय, गायन तर त्यापेक्षा अधिक परिणामकारक, त्यामुळे हे गाणे आजही लोकांच्यात प्रसिद्ध आहे, यात नवल ते कुठले!! तुमको देखा तो ख़याल आया ज़िंदगी धुप, तुम घना साया आज फिर दिल ने एक तमन्ना की आज फिर दिल को हमने समझाया तुम चले जाओगे तो सोचेंगे हमने क्या खोया, हमने क्या पाया हम जिसे गुनगुना नहीं सकते वक़्त ने ऐसा गीत क्यूँ गाया Tum Ko Dekha Toh Ye Khayal | Saath Saath -1982| Deepti Naval | Farooq sheikh | Jagjit Singh |Ghazals - YouTube

No comments:

Post a Comment