Tuesday 24 January 2023

डायलिसिस - एक अनुभव

आज नेहमीप्रमाणे बॉंबे हॉस्पिटलमध्ये पहाटे ५.३० वाजता डायलिसिस करायला गेलो. गेले काही महिने मी पहाटेच जातो.त्यात मोठा फायदा, दोन्ही वेळेस घरचे जेवण मिळायला लागले. दुसरा फायदा, सगळं दिवस तुम्ही सजगपणे घालवू शकता. तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे, डायलिसिसची सायकल (४ तासाची सायकल असते) संपली की तुम्हाला मशीनपासून वेगे केले जाते आणि हाताच्या शिरांवर घुसलेल्या (अर्थ शब्दाश: घ्यावा) सुया बाहेर काढून तिथे गॉज कॉटनचे बँडेज बांधले जाते. हे बँडेज अंगावर कमीतकमी ४ तास बाळगावे लागते. पूर्वी सुरवातीला मी दुपारच्या ३ वाजताच्या बॅचमध्ये जात होतो. आता दुपारी ३ वाजता सुरु होणार म्हणजे संपायला संध्याकाळचे ७ व्हायचे. त्यापुढे हातावर भलेमोठे बँडेज बाळगायचे!! परिणामी रात्रीची झोप कमी झाली आणि मानसिक त्रास व्हायचा तो वेगळाच. आता मी या सगळ्या उपचारांना सरावलो आहे. मला सुरवातीचे दिवस आठवले कारण आज माझ्या हातात रक्ताची मोठी गुठळी झाली. डायलिसिस चालू असताना, असे काही होणे, भयंकर त्रासदायक असते. वास्तविक वेदना होत नाहीत पण हातातून रक्ताची धार लागली आहे, हे दृश्य काही सुखावह नव्हतेच. मी झोपलेला बेड रक्ताने भिजायला लागला आणि मी परिचारिकेला हाक मारली आणि रक्त गालात असल्याचे दाखवले. तिने लगोलग डॉक्टरला बोलावले आणि ४,५ मिनिटे मशीन बंद करून, तो क्लॉट काढून जागा स्वच्छ केली आणि पुनश्च डायलिसिस सुरु झाले. वास्तविक डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णाला अनुभवाला अधूनमधून सामोरे जावे लागत असते. फक माझी मानसिक तयारी नव्हती. आज घरी आलो आणि गेले ९ महिने डोळ्यांसमोर आले. १ मे २०२२ रोजी माझी डायलिसिस ट्रीटमेंट सुरु झाली. सुरवातीला माझा समाज असा होता, फार तर ५,६ सायकल्स संपल्या की मी पूर्ववत आयुष्य जगायला सुरु करिन पण प्रत्यक्षात, आत आयुष्यभर करायला लागणार, ही वस्तुस्थिती लवकरच ध्यानात आली. म्हटले तर हा मानसिक धक्काच होता पण मीच मला समजावले. सुरवातीला माझे शरीर तितकेसे तयार नव्हते, हे आता लक्षात आले कारण सुरवातीच्या २,३ सायकल्स पूर्ण करून घरी आलॊ आणि जेवणानंतर थाळी धुवायला खुर्चीवरून उठलो आणि माझा तोल जाऊन, मी जमिनीवर बसकण मारली. हा अनुभव मलाच अवाक करणारा होता, हे असे होईल, अशी पहिल्या अनुभवापर्यंत तरी कल्पना केली नव्हती. पुढील २ महिन्यानंतरच्या सायकलच्या वेळी तर, मी पहाटेच्या बॅचला जायला लागलो. अशाच एका प्रसंगी, जेवण झाले आणि पुन्हा खुर्चीत बसायला पाऊल टाकले आणि माझा तोल गेला!! नशिबाने घरात त्यावेळी धुणी,भांडी करणारा गडी काम करीत होता आणि त्याला मोठा आवाज ऐकायला मिळाला. त्याने, मी जमिनीवर पडल्याचे बघताच, मला आधार देऊन, पलंगावर झोपवले आणि अंगावर चादर टाकली. मी लगोलग झोपेच्या आधीन झालो. असे अनुभव फार नाही पण ४ वेळा आले पण पुढे मलाच कळले, अशा वेळेस स्वतःला कसे सावरून घ्यायचे. यात एक गोम अशी आहे, डायलिसिस पूर्ण होते तेंव्हा तुमचे कमीतकमी १.५० ते २ किलो वजन कमी होते आणि हे शरीराला झेपणे अवघड जाते. पुढे मनाची सवय करून घेतली. आज तर मी डायलिसिस करून आलो आहे आणि हा लेख लिहायला बसलो आहे!! गेल्या १० महिन्यात माझे ७४ किलो वजन, आज ६२ किलो इतके उतरले आहे. याचा परिणाम शरीरावर होणारच होता, फक्त मी अनभिज्ञ होतो, इतकेच. आता हा सगळं खेळ माझ्या आकलनात आला आहे आणि आता यातून सुटका सहजासहजी होणार नाही, हे समजले आहे. एक तर डायलिसिस हा उपचार नसून,बिघडलेल्या किडनी फंक्शन्स सुरळीत केली जातात. किडनी बिघडली म्हणजे एकाच उपाय हाती असतो, शरीरात नवीन किडनी बसवणे. अर्थात खर्चाचा भाग बाजूला ठेवला तरी शरीरात नवीन किडनी बसवणे आणि आपल्या शरीराने मेनी करणे, ही प्रक्रिया अतोनात किचकट आहे आणि यश मिळेलच याचीखात्री कुणीही देत नाही, कारण आपल्या शरीरातील चलनवलन अचूकपणे आजही शास्त्राला यश मिळालेले नाही. आज बॉंबे हॉस्पिटलमध्ये १३ आणि १४वा मजला फक्त डायलिसिस साठी राखून ठेवलेला आहे. थोडक्यात सकाळी ७ वाजता पहिली बॅच सुरु होते, पुढील बॅच ११ वाजताची आणि शेवटची बॅच दुपारी ३ वाजता असते आणि कुठल्याही बॅचमध्ये एखादा पलंग रिकामा आहे, असे अजिबात घडत नाही!! त्यामुळे समजा तुम्ही, तुमची वेळ चुकवली तर हॉस्पिटल घरी फोन करतात आणि का आला नाहीत, याची चौकशी करतात आणि त्या रुग्णाला दुसऱ्या वेळी सामावून घेणे फार जिकिरीचे असते, एकदा मला हा अनुभव आला होता. खरंतर इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक बाब ठामपणे माहीत असते आणि ती म्हणजे हळूहळू आपण मृत्यूच्या दरवाजात जात आहोत!! हे लिहू/बोलू नये पण हे परखड वास्तव आहे. मला इथे २,३ रुग्ण भेटले होते आणि त्यांनी माझ्याशी बोलून दाखवले होते. इथे सगळे मनातल्या मनात झुरत असतात. अगदी मी देखील, जरी मी वरकरणी दाखवत नसलो तरी. जसे वय वाढत जाते, तशी डायलिसिसची उपयुक्तता कमी होते आणि अटळ परिणामांना सामोरे जावेच लागते. दुसरा तरुणोपाय नसतो. इथे काही रुग्णांच्या समवेत त्यांचे नातेवाईक येतात आणि त्यांचे चेहरे निरखणे, हा आणखी भोग असतो. वरकरणी सगळे हसत असतात आणि चेंडूला पाण्यात दाबून ठेवण्यासारखा असफल खेळ असतो. कुणीही काहीही बोलत नसते कारण प्रत्येकाला याचा शेवटकाय आहे, याची पूर्ण कल्पना असते. इथेच मला काही रुग्ण गेली १८ वर्षे डायलिसिस घेत असल्याचे समजले. ऐकले आणि मी थक्क झालो. त्याचे वय माझ्याच आसपास आहे म्हणजे अर्धे आयुष्य हॉस्पिटलच्या बेडवर गेले. कुठली दुर्दम्य इच्छाशक्ती, त्यांनी आजमितीस धरून ठेवली आहे? प्रश्नच आहे. दुसरा मुद्दा म्हणजे येणाऱ्या रुग्णात बव्हंशी स्त्रिया आहेत!! खरंतर आपली किडनी कशी बिघडते, हा संशोधनाचाच विषय आहे. त्यामानाने मी सुदैवी नव्हे का? आयुष्याचे जरी सगळे उपभोग भोगले नसले तरी आयुष्याकडे त्रयस्थपणे बघण्याची संधी मला मिळाली. माझे डायलिसिस मागील वर्षी सुरु झाले म्हणजे साठी होऊन गेल्यावर. तोपर्यंतचे आयुष्य मला उपभोगायला मिळाले, हा नियतीने दिलेला प्रसाद म्हणायचं का? डायलिसिस अटळ आहे, हे ठरल्यावर मी माझा दिनक्रम बदलला.त्यातून मला पहाटेची बॅच मिळाल्यावर, आपला दिवसाचा कार्यक्रम कसा आखायचा? हे ठरवून टाकले. अर्थात बाहेर पडायची सोय नाही. त्यामुळे घरातल्याघरात काय करता येईल, याचा विचार केला. मध्यंतरी वाचन फारच कमी झाले होते, विशेषतः कविता वाचन पूर्णपणे थंडावले होते. त्या पुस्तकांकडे नजर वळवली. शरीरात फारशी ताकद नाही त्यामुळे कवितासंग्रह हातात घेऊन वाचणे, सहज शक्य होते. ४ तास डायलिसिस म्हटल्यावर एक ठरवून टाकले. घरून निघताना, मोबाईल पूर्ण चार्ज करून घ्यायचा. एकदा ती उपाचार पद्धती सुरु झाली की तुम्ही पलंगाला जखडलेले असतात. जरा हालचाल करायला वाव नसतो. मग, मी मोबाईलवर गाणी लावायला सुरवात केली. सुदैवाने माझ्या फोनमध्ये, सर्व प्रकारचे संगीत आहे, अगदी पाश्चात्य कलाकार देखील!! परिणामी, सलग ४ तास संगीत ऐकायला सुरवात झाली आणि वेळ कधी संपायला लागला, हेच फारसे लक्षात येत नाही. किंबहुना, लताबाई, आशाबाई किंवा व्हिटने ह्यूस्टन तसेच सेलीन डियॉन, यांची गायकी मला अधिक चांगली समजायला लागली. आजूबाजूचे रुग्ण देखील खुश!! हॉस्पिटलमध्ये बहुदा गाणी लावणारा, मीच एकमेव रुग्ण असावा. अर्थात आवाजाची मर्यादा पाळणे गरजेचे असते. सगळेच रुग्ण काही तुमच्या प्रकृतीसारखे नसतात. अर्थात सगळेच काही व्यवस्थित झाले नाही. मध्यंतरी डायलिसिस चालू असताना, अचानक दोन्ही तळपायातून पेटगे यायला लागले. अनिल अत्यवस्थ!! कला तर अशा जोरदार यायच्या की डोळ्यांतून पाणी यायचे. साठी पार केली म्हणजे काही फार मोठे दिवे लावले नाहीत, हे दाखवून देणारे हे क्षण. परिचारिकेला बोलावण्याइतकी ताकद नसायची. मग उजव्या हाताच्या बोटांच्या खुणा सुरु केल्या आणि त्यांना कसेबसे सांगितले. लगेच डॉक्टरला बोलावले आणि डायलिसिस चक्क थांबवले!! संपूर्ण विभाग एयर कंडिशन्ड होता तरी अंगातील टी शर्ट घामाने ओला झाला. शेवटी नेफ्रोलॉजिस्टची भेट घेतली आणि काही दिवस इंजेक्शन घ्यायला लागले. मनावर फारच दडपण यायला लागले होते. चार लोकांच्या समोर आपले दुखणे उघडे पडणे, यासारखी शरमेची गोष्ट नाही. एकदा तर युरीनची कळ लागली, बरे पलंगावरून उठणे अशक्य!! मग तिथल्या मामाला बोलावणे पाठवले आणि त्याने प्लास्टिकचे भांडे आणले आणि कळ कमी केली. तेंव्हा पासून एक काळजी घ्यायला लागलो, पहाटे घरातून बाहेर पडण्याआधी, सकाळचे सगळे विधी व्यवस्थित पार केल्यानंतरच घर सोडायचे. डायलिसिस करताना, रुग्णांना नाश्ता मिळतो (दुपारच्या रुग्णांना जेवण मिळते) परंतु नाश्ता झाल्यावर पाणी मिळत नाही. याची सवय करून घ्यायला थोडा त्रास पडतो कारण, डायलिसिस करताना, रक्त आणि पाणी वेगळे केले जाते आणि तसे चालू असताना, शरीरात पाणी भरणे, चुकीचे!! मध्यंतरी माझ्या छातीत दुखायला लागले, इतके की रात्री झोप यायची बंद झाली. जरा पलंगावर आडवे झाली छातीत कळा सुरु, पहाटे कधीतरी ग्लानी यायची आणि आपसूक डोळे मिटायचे. याचा, ज्या दिवशी डायलिसिस असेल तेंव्हा फारच त्रास व्हायला लागले. शेवटी डॉक्टर गाठला. सगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या आणि छातीत २ ब्लॉक आहेत, हे निदान झाले. अँजिओप्लास्टी हाच उपाय असल्याचे निदान झाले. अर्थात पुण्याहून आदित्यआणि नेहा, तडक घरी आले. वास्तविक अँजिओप्लास्टी फार वेदनादायक नसते (या शरीराने आतापर्यंत इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता साधे इंजेक्शन घ्यायचे तर काहीच वाटत नाही) पण २ दिवस "आयसीयू" मध्ये राहावे लागते. आता आयसीयू म्हणजे बाहेरच्या जगाशी संपर्क शून्य!! तरीही ते सगळे पचवले. वास्तविक मला उपचार सुरु करून फक्त ९(च) महिने झालेत, अजून बराच पल्ला गाठायचा आहे, इच्छा आज नेहमीप्रमाणे बॉंबे हॉस्पिटलमध्ये पहाटे ५.३० वाजता डायलिसिस करायला गेलो. गेले काही महिने मी पहाटेच जातो.त्यात मोठा फायदा, दोन्ही वेळेस घरचे जेवण मिळायला लागले. दुसरा फायदा, सगळं दिवस तुम्ही सजगपणे घालवू शकता. तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे, डायलिसिसची सायकल (४ तासाची सायकल असते) संपली की तुम्हाला मशीनपासून वेगे केले जाते आणि हाताच्या शिरांवर घुसलेल्या (अर्थ शब्दाश: घ्यावा) सुया बाहेर काढून तिथे गॉज कॉटनचे बँडेज बांधले जाते. हे बँडेज अंगावर कमीतकमी ४ तास बाळगावे लागते. पूर्वी सुरवातीला मी दुपारच्या ३ वाजताच्या बॅचमध्ये जात होतो. आता दुपारी ३ वाजता सुरु होणार म्हणजे संपायला संध्याकाळचे ७ व्हायचे. त्यापुढे हातावर भलेमोठे बँडेज बाळगायचे!! परिणामी रात्रीची झोप कमी झाली आणि मानसिक त्रास व्हायचा तो वेगळाच. आता मी या सगळ्या उपचारांना सरावलो आहे. मला सुरवातीचे दिवस आठवले कारण आज माझ्या हातात रक्ताची मोठी गुठळी झाली. डायलिसिस चालू असताना, असे काही होणे, भयंकर त्रासदायक असते. वास्तविक वेदना होत नाहीत पण हातातून रक्ताची धार लागली आहे, हे दृश्य काही सुखावह नव्हतेच. मी झोपलेला बेड रक्ताने भिजायला लागला आणि मी परिचारिकेला हाक मारली आणि रक्त गालात असल्याचे दाखवले. तिने लगोलग डॉक्टरला बोलावले आणि ४,५ मिनिटे मशीन बंद करून, तो क्लॉट काढून जागा स्वच्छ केली आणि पुनश्च डायलिसिस सुरु झाले. वास्तविक डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णाला अनुभवाला अधूनमधून सामोरे जावे लागत असते. फक माझी मानसिक तयारी नव्हती. आज घरी आलो आणि गेले ९ महिने डोळ्यांसमोर आले. १ मे २०२२ रोजी माझी डायलिसिस ट्रीटमेंट सुरु झाली. सुरवातीला माझा समाज असा होता, फार तर ५,६ सायकल्स संपल्या की मी पूर्ववत आयुष्य जगायला सुरु करिन पण प्रत्यक्षात, आत आयुष्यभर करायला लागणार, ही वस्तुस्थिती लवकरच ध्यानात आली. म्हटले तर हा मानसिक धक्काच होता पण मीच मला समजावले. सुरवातीला माझे शरीर तितकेसे तयार नव्हते, हे आता लक्षात आले कारण सुरवातीच्या २,३ सायकल्स पूर्ण करून घरी आलॊ आणि जेवणानंतर थाळी धुवायला खुर्चीवरून उठलो आणि माझा तोल जाऊन, मी जमिनीवर बसकण मारली. हा अनुभव मलाच अवाक करणारा होता, हे असे होईल, अशी पहिल्या अनुभवापर्यंत तरी कल्पना केली नव्हती. पुढील २ महिन्यानंतरच्या सायकलच्या वेळी तर, मी पहाटेच्या बॅचला जायला लागलो. अशाच एका प्रसंगी, जेवण झाले आणि पुन्हा खुर्चीत बसायला पाऊल टाकले आणि माझा तोल गेला!! नशिबाने घरात त्यावेळी धुणी,भांडी करणारा गडी काम करीत होता आणि त्याला मोठा आवाज ऐकायला मिळाला. त्याने, मी जमिनीवर पडल्याचे बघताच, मला आधार देऊन, पलंगावर झोपवले आणि अंगावर चादर टाकली. मी लगोलग झोपेच्या आधीन झालो. असे अनुभव फार नाही पण ४ वेळा आले पण पुढे मलाच कळले, अशा वेळेस स्वतःला कसे सावरून घ्यायचे. यात एक गोम अशी आहे, डायलिसिस पूर्ण होते तेंव्हा तुमचे कमीतकमी १.५० ते २ किलो वजन कमी होते आणि हे शरीराला झेपणे अवघड जाते. पुढे मनाची सवय करून घेतली. आज तर मी डायलिसिस करून आलो आहे आणि हा लेख लिहायला बसलो आहे!! गेल्या १० महिन्यात माझे ७४ किलो वजन, आज ६२ किलो इतके उतरले आहे. याचा परिणाम शरीरावर होणारच होता, फक्त मी अनभिज्ञ होतो, इतकेच. आता हा सगळं खेळ माझ्या आकलनात आला आहे आणि आता यातून सुटका सहजासहजी होणार नाही, हे समजले आहे. एक तर डायलिसिस हा उपचार नसून,बिघडलेल्या किडनी फंक्शन्स सुरळीत केली जातात. किडनी बिघडली म्हणजे एकाच उपाय हाती असतो, शरीरात नवीन किडनी बसवणे. अर्थात खर्चाचा भाग बाजूला ठेवला तरी शरीरात नवीन किडनी बसवणे आणि आपल्या शरीराने मेनी करणे, ही प्रक्रिया अतोनात किचकट आहे आणि यश मिळेलच याचीखात्री कुणीही देत नाही, कारण आपल्या शरीरातील चलनवलन अचूकपणे आजही शास्त्राला यश मिळालेले नाही. आज बॉंबे हॉस्पिटलमध्ये १३ आणि १४वा मजला फक्त डायलिसिस साठी राखून ठेवलेला आहे. थोडक्यात सकाळी ७ वाजता पहिली बॅच सुरु होते, पुढील बॅच ११ वाजताची आणि शेवटची बॅच दुपारी ३ वाजता असते आणि कुठल्याही बॅचमध्ये एखादा पलंग रिकामा आहे, असे अजिबात घडत नाही!! त्यामुळे समजा तुम्ही, तुमची वेळ चुकवली तर हॉस्पिटल घरी फोन करतात आणि का आला नाहीत, याची चौकशी करतात आणि त्या रुग्णाला दुसऱ्या वेळी सामावून घेणे फार जिकिरीचे असते, एकदा मला हा अनुभव आला होता. खरंतर इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक बाब ठामपणे माहीत असते आणि ती म्हणजे हळूहळू आपण मृत्यूच्या दरवाजात जात आहोत!! हे लिहू/बोलू नये पण हे परखड वास्तव आहे. मला इथे २,३ रुग्ण भेटले होते आणि त्यांनी माझ्याशी बोलून दाखवले होते. इथे सगळे मनातल्या मनात झुरत असतात. अगदी मी देखील, जरी मी वरकरणी दाखवत नसलो तरी. जसे वय वाढत जाते, तशी डायलिसिसची उपयुक्तता कमी होते आणि अटळ परिणामांना सामोरे जावेच लागते. दुसरा तरुणोपाय नसतो. इथे काही रुग्णांच्या समवेत त्यांचे नातेवाईक येतात आणि त्यांचे चेहरे निरखणे, हा आणखी भोग असतो. वरकरणी सगळे हसत असतात आणि चेंडूला पाण्यात दाबून ठेवण्यासारखा असफल खेळ असतो. कुणीही काहीही बोलत नसते कारण प्रत्येकाला याचा शेवटकाय आहे, याची पूर्ण कल्पना असते. इथेच मला काही रुग्ण गेली १८ वर्षे डायलिसिस घेत असल्याचे समजले. ऐकले आणि मी थक्क झालो. त्याचे वय माझ्याच आसपास आहे म्हणजे अर्धे आयुष्य हॉस्पिटलच्या बेडवर गेले. कुठली दुर्दम्य इच्छाशक्ती, त्यांनी आजमितीस धरून ठेवली आहे? प्रश्नच आहे. दुसरा मुद्दा म्हणजे येणाऱ्या रुग्णात बव्हंशी स्त्रिया आहेत!! खरंतर आपली किडनी कशी बिघडते, हा संशोधनाचाच विषय आहे. त्यामानाने मी सुदैवी नव्हे का? आयुष्याचे जरी सगळे उपभोग भोगले नसले तरी आयुष्याकडे त्रयस्थपणे बघण्याची संधी मला मिळाली. माझे डायलिसिस मागील वर्षी सुरु झाले म्हणजे साठी होऊन गेल्यावर. तोपर्यंतचे आयुष्य मला उपभोगायला मिळाले, हा नियतीने दिलेला प्रसाद म्हणायचं का? डायलिसिस अटळ आहे, हे ठरल्यावर मी माझा दिनक्रम बदलला.त्यातून मला पहाटेची बॅच मिळाल्यावर, आपला दिवसाचा कार्यक्रम कसा आखायचा? हे ठरवून टाकले. अर्थात बाहेर पडायची सोय नाही. त्यामुळे घरातल्याघरात काय करता येईल, याचा विचार केला. मध्यंतरी वाचन फारच कमी झाले होते, विशेषतः कविता वाचन पूर्णपणे थंडावले होते. त्या पुस्तकांकडे नजर वळवली. शरीरात फारशी ताकद नाही त्यामुळे कवितासंग्रह हातात घेऊन वाचणे, सहज शक्य होते. ४ तास डायलिसिस म्हटल्यावर एक ठरवून टाकले. घरून निघताना, मोबाईल पूर्ण चार्ज करून घ्यायचा. एकदा ती उपाचार पद्धती सुरु झाली की तुम्ही पलंगाला जखडलेले असतात. जरा हालचाल करायला वाव नसतो. मग, मी मोबाईलवर गाणी लावायला सुरवात केली. सुदैवाने माझ्या फोनमध्ये, सर्व प्रकारचे संगीत आहे, अगदी पाश्चात्य कलाकार देखील!! परिणामी, सलग ४ तास संगीत ऐकायला सुरवात झाली आणि वेळ कधी संपायला लागला, हेच फारसे लक्षात येत नाही. किंबहुना, लताबाई, आशाबाई किंवा व्हिटने ह्यूस्टन तसेच सेलीन डियॉन, यांची गायकी मला अधिक चांगली समजायला लागली. आजूबाजूचे रुग्ण देखील खुश!! हॉस्पिटलमध्ये बहुदा गाणी लावणारा, मीच एकमेव रुग्ण असावा. अर्थात आवाजाची मर्यादा पाळणे गरजेचे असते. सगळेच रुग्ण काही तुमच्या प्रकृतीसारखे नसतात. अर्थात सगळेच काही व्यवस्थित झाले नाही. मध्यंतरी डायलिसिस चालू असताना, अचानक दोन्ही तळपायातून पेटगे यायला लागले. अनिल अत्यवस्थ!! कला तर अशा जोरदार यायच्या की डोळ्यांतून पाणी यायचे. साठी पार केली म्हणजे काही फार मोठे दिवे लावले नाहीत, हे दाखवून देणारे हे क्षण. परिचारिकेला बोलावण्याइतकी ताकद नसायची. मग उजव्या हाताच्या बोटांच्या खुणा सुरु केल्या आणि त्यांना कसेबसे सांगितले. लगेच डॉक्टरला बोलावले आणि डायलिसिस चक्क थांबवले!! संपूर्ण विभाग एयर कंडिशन्ड होता तरी अंगातील टी शर्ट घामाने ओला झाला. शेवटी नेफ्रोलॉजिस्टची भेट घेतली आणि काही दिवस इंजेक्शन घ्यायला लागले. मनावर फारच दडपण यायला लागले होते. चार लोकांच्या समोर आपले दुखणे उघडे पडणे, यासारखी शरमेची गोष्ट नाही. एकदा तर युरीनची कळ लागली, बरे पलंगावरून उठणे अशक्य!! मग तिथल्या मामाला बोलावणे पाठवले आणि त्याने प्लास्टिकचे भांडे आणले आणि कळ कमी केली. तेंव्हा पासून एक काळजी घ्यायला लागलो, पहाटे घरातून बाहेर पडण्याआधी, सकाळचे सगळे विधी व्यवस्थित पार केल्यानंतरच घर सोडायचे. डायलिसिस करताना, रुग्णांना नाश्ता मिळतो (दुपारच्या रुग्णांना जेवण मिळते) परंतु नाश्ता झाल्यावर पाणी मिळत नाही. याची सवय करून घ्यायला थोडा त्रास पडतो कारण, डायलिसिस करताना, रक्त आणि पाणी वेगळे केले जाते आणि तसे चालू असताना, शरीरात पाणी भरणे, चुकीचे!! मध्यंतरी माझ्या छातीत दुखायला लागले, इतके की रात्री झोप यायची बंद झाली. जरा पलंगावर आडवे झाली छातीत कळा सुरु, पहाटे कधीतरी ग्लानी यायची आणि आपसूक डोळे मिटायचे. याचा, ज्या दिवशी डायलिसिस असेल तेंव्हा फारच त्रास व्हायला लागले. शेवटी डॉक्टर गाठला. सगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या आणि छातीत २ ब्लॉक आहेत, हे निदान झाले. अँजिओप्लास्टी हाच उपाय असल्याचे निदान झाले. अर्थात पुण्याहून आदित्यआणि नेहा, तडक घरी आले. वास्तविक अँजिओप्लास्टी फार वेदनादायक नसते (या शरीराने आतापर्यंत इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता साधे इंजेक्शन घ्यायचे तर काहीच वाटत नाही) पण २ दिवस "आयसीयू" मध्ये राहावे लागते. आता आयसीयू म्हणजे बाहेरच्या जगाशी संपर्क शून्य!! तरीही ते सगळे पचवले. वास्तविक मला उपचार सुरु करून फक्त ९(च) महिने झालेत, अजून बराच पल्ला गाठायचा आहे, इच्छा एकच आणखी काही बरेवाईट होऊ नये.

No comments:

Post a Comment